पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील शिवाजीनगर - गोखलेनगर इथं सुगम चाळीमध्ये राहणा-या निखिल धोत्रे यानं रविवारी संध्याकाळी राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्येआधी या व्यक्तीनं लिहिलेलं पत्र सापडलंय. त्यात सासूरवाडीच्या जाचाला कंटाळून तसंच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं निखिल धोत्रेने म्हटलं आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. आई तू काळजी करू नकोस मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे असं पत्रात निखिल धोत्रेने लिहिलं आहे. 


एका वर्षांपूर्वीच निखिलचं लग्न झालं होतं. निखिलची पत्नी नऊ महिन्यांची गरदोर आहे. आपल्या बाळाची चिंता सतावत असल्या कारणाने त्याने चिठ्ठीत आईला आपल्या बाळाची काळजी घेण्यास सांगितलं आहे.