नागपूर : विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. भाजपमध्ये सुरु असलेल्या या प्रवेशावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. 'सत्ता बदलली की लोक पण बदलतात, हे बरोबर नाही. मात्र अशावेळी थोडा संयम ठेवला पाहीजे. जहाज बुडाल्यावर जसे उंदीर पळतात, तसे लोक दुसऱ्या पक्षात पळतात, मात्र असे लोक कधीच इतिहास घडवू शकत नाहीत, असा टोला नितीन गडकरी यांनी लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावं, असा विचार माझ्या मनात कधीही आला नाही, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. दरम्यान राजकारणात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही समस्या असल्याचंही ते म्हणाले.