मुंबई : मोठ्या शहरांतलं भारनियमन तात्पुरतं मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई पूर्व उपनगरातल्या मुलुंड, भांडूप, तसंच ठाणे, नाशिक आणि पुणे शहरांमधलं भारनियमन तात्पुरतं मागे घेतलं जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या शहरांमधलं भारनियमन कमी करण्यासाठी बाहेरून वीज घेण्यात आली आहे. मात्र इतर ठिकाणचं म्हणजेच ग्रामीण आणि निमशहरी भागातलं भारनियमन सुरुच राहणार आहे. राज्यात सध्या एकवीसशे मेगावॅट विजेचा तुटवडा आहे.


कोळसा खाणींमध्ये पाणी गेल्यामुळं वीज निर्मितीला फटका बसल्याचा दावा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. लोडशेडिंगची समस्या तात्पुरती असून 15 दिवसांत सुरळीत होणार असल्याचा विश्वास ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केलाय. मात्र दिवाळीच्या काळात लोडशेडिंग होणार नसल्याचं आश्वासन बावनकुळेंनी दिलंय. तर सरकारला कोळशाचा साठा सांभाळता न आल्यामुळंच लोडशेडिंगची समस्या उदभवल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलीय.