प्रफुल्ल पवार / रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात भली मोठी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्पच आहे. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही दरट कोसळली. त्यात पाऊस सुरु असल्याने रात्री दरड हटविणे कठिण जात होते. दरम्यान, सकाळपर्यंत दरट हटविण्याचे काम अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे काल रात्रीपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंदच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई - गोवा महामार्गावर धामणदेवी गावाजवळ रात्री ८ वाजता कोसळली दरड होती. या दरडीचा जवळपास २०० मीटर लांब रस्त्यावर मातीचा ढिगारा आला आहे. त्यामुळे ही दरड बाजुला करण्यास उशीर होत आहे. एक जेसीबी आणि एका पोकलेनच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, आज सकाळपर्यंत दरड हटविण्याचे काम सुरु असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अद्यापही ठप्पच आहे.



घटनास्थळी पोलादपूर पोलीस आणि एल अँड टीची टीम पोहोचली आहे. दरड रस्त्यावरुन बाजुला करण्याचे काम पूर्ण व्हायला किमान १० तास लागण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती देताना सांगितले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक जवळपास १० तास ठप्पच आहे. दरम्यान, वाहतूक म्हाप्रळ आंबेत मार्गे वळवण्यात आली आहे.