सांगली : अशोक चव्हाण हे चांगले नेते आहेत पण ते मध्येच घोटाळेही करतात असा चिमटा काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी अशोक चव्हाणांना काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण कोणत्या पक्षात जाईल हे सांगणं अशक्य असल्याचे सांगत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी खासदार संजयकाका पाटील यांना टोला लगावला. तर विकासासाठी नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन अशोक चव्हाणांनी केलं.


सांगलीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होतं मदन पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उदघाटनाचं. यावेळी खासदार संजयकाका पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे दिलीप तात्या पाटील, शिवसेनेचे गौतम पवार हे सर्वच पक्षाचे नेते एका व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राजकीय टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळालं.