बदलापूर : कल्याणहून पुण्याला जाण्यासाठी महत्त्वाचा असललेल्या कर्जत महामार्गाची बदलापूरपासून अतिशय दूरावस्था झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा प्रवास खडतर बनलाय.. या खड्डयांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय... तसंच वाहतूक कोंडीचं प्रमाणही वाढलंय. 


प्रशासनाचं या महामार्गाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ऐन सणाच्या दिवसांमध्ये नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. याबाबत या रस्त्याची मुख्य जबाबदारी असलेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, या रस्त्याची जबाबदारी जून महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे त्यांनी सांगितले.


तर सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत विचारणा केली असता, हा रस्ता नुकताच आमच्याकडे आल्याने अद्याप त्याच्या दुरूस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.