नागपूर : सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाल मात्र श्रीमंतांवर पडणाऱ्या छाप्यामुळे ते खुश होते, त्यामुळे तो राग दिसून आला नाही अशी जाहीर कबुली केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.


सरकार ते मग कोणाचेही असो ते बंद गाडीप्रमाणे असते. त्याला धक्का मारल्याशिवाय ते सुरु होत नाही असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नागपुरात राष्ट्रीय कारागीर परिषदेच्या समारोप प्रसंगी त्यांनी हे विधान केलं.