रत्नागिरी : Ratnagiri Fisherman : राज्य सरकारने काढलेल्या नव्या मच्छीमारी कायद्याविरोधात रत्नागिरीतील पर्ससीन मच्छिमार आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात चार ते पाच हजार मच्छिमार सहभागी झाले. आम्हाला आकारला जात असलेला दंड, केवळ चारच महीने मच्छीमारीला असलेली परवानगी हे नवीन कायद्यातील नियम मच्छीमारांसाठी मारक आहेत. त्याबाबत सरकारने पुर्नरविचार करावा अन्यथा आगामी काळात थेट मुंबईत मंत्रालयावर धडकू, असा थेट इशारा मच्छिमारांनी दिला आहे.