पिंपरी चिंचवड: गेल्या काही दिवसांपासून वाहणांच्या जाळपोळीच्या घटना अद्यापही सुरूच आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाटनगर परिसरातील पत्राशेड इथं वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार वाहनांच नुकसान झालय. एका अल्पवयीन मुलानं ५ दुचाकी जाळून टाकल्या आहेत. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडलीय. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सतत होणाऱ्या या घटनांमुळे शहरवासीय मात्र हवालदिल झालेत...!