पुणे : रुपी बॅंकेच्या ठेवीदार आणि कर्मचा-यांनी आज पुण्यातील टिळक चौकात मानवी साखळी करुन जोरदार आंदोलन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

31 मे च्य़ा आधी रुपी बॅंकेचं विलीनीकरण सक्षम बॅंकेत करावं. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी राज्य सरकार आणि रिझर्व बॅंकेने लक्ष घालावं, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. पुणेकर नागरिक कृती समिती , बॅंक कर्मचारी संघटना , रुपी बॅंक ठेवीदार हक्क समिती यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बॅंकेच्या कारभारा विरोधात  जोरदार निदर्शनं केली.


आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.