मुंबई : रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हात मुसळधार पाऊस सुरु आहे. आता तिन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तर रत्नागिरी आणि रायगडसाठी पुढील 3 दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात अनेक दिवसापासून दडी मारुन बसलेल्या पावसाला काही भागात सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उपनगरात ही पावसाचा जोर कायम आहे.


कोल्हापूर, अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस होतोय. येथे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 6 फुटांनी वाढ झाली आहे.


अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईत ही मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक मंदावली आहे.