बेळगाव : राज्य सरकारनं वेळीच बळीराजाचा अक्रोश समजून घेऊन त्यांना मदतीचा हात द्यावा. अन्यथा बळीराजा सरकारला पाताळात गाडल्याशिवाय गप्प राहाणार नाही असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतक-यांनी आपल्या न्याय हक्कासाठी काढलेला आक्रोश मोर्चा हा सरकारला इशारा आहे असल्याचंही राजू शेट्टी म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या या मार्ग रास्त आहेत. राज्यकर्ते बोलत असले की शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडवले आहेत तर त्यांनी या मोर्चावरुन लक्षात घेतलसं पाहिजे की, शेतकऱ्यांचा उद्रेक होत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाले तर शेतकरी गावातून यांना फिरु देखील देणार नाहीत. पाठिंबा देऊन प्रश्न सुटणार नाही. अनेक संघटना आपल्या परिने आंदोलन करत आहेत. एकदिवस सर्व संघटना एकत्र येतील तेव्हा सरकारला गुडघे टेकावे लागतील. असं देखील खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.


पाहा काय बोलले राजू शेट्टी