नागपूर : शेतक-यांच्या प्रश्नावर येत्या 20 नोव्हेंबरला दिल्लीत शेतक-यांच्या विशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली. नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यात आयोजित पाणी हक्क परिषदेत ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकी दरम्यान शेतक-यांना दिलेलं आश्वासन पाळावं अशी मागणीही राजू शेट्टी यांनी यावेळी केली. राम सत्यवचनी होता मग रामाचे भक्त मोदी हे असत्यवचनी कसे असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे.