अहमदनगर : जिल्हा मोठा असल्याने त्याचं विभाजन करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून आहे.


महावितरणच्या कर्मचा-यांनीही जिल्ह्यात दोन डिव्हीजन करण्याची मागणी केली. येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधी या जिल्ह्याचं विभाजन केलं जाईल अशी घोषणा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केलाय. राम शिंदेंच्या जिल्हा विभाजनाच्या वक्तव्याने पुन्हा एकदा जिल्ह्याचं राजकारण आणि जिल्हा विभाजनाचा प्रश्न ढवळून निघणार आहे.