राजापूर :   रत्नागिरीतील राजापूर वाटूळजवळ गोवा-मुंबई महामार्गावर खासगी बसला रात्री अपघात झाला आहे. गोव्याहून मुंबईला परतणाऱ्या बसच्या अपघातात २ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या अपघातात ३२ जण जखमी झाले आहेत. ही बस काल संध्याकाळी गोव्यावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले अनेक जण या बसने प्रवास करत होते. राजापूरच्या वाटूळजवळ चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाली. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका प्रवाशावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला.  इतर जखमींवर लांजा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या भाविकांनी रस्ते मार्गाने जाणे पसंत केले. त्यामुळे एसटी आणि खासगी बसेसमध्ये मोदी गर्दी झाल्याचे पाहायला मिळतेय.