औरंगाबाद : औरंगाबाद शहरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघाजणांना भरधाव वाहनाने चिरडले आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना रोडवरील केंब्रिजशाळेजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. 


सर्व मृतदेह घाटी रुग्णालयात ठेवण्यात आले असून, वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. फरारवाहनचालकाचा शोध सुरु आहे. स्कॉर्पिओ गाडीने हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.