औरंगाबाद : देशभक्तीसाठी मुलं जन्माला घाला...तुम्हाला शक्य नसेल, तर त्यांचं संगोपन आम्ही करू असं खळबळजनक विधान साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी म्हटलंय. 


भारत माता निर्माण होईल....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलं किती असावीत यावरून खूप वाद होतात...पण असे वाद करणे योग्य नाही, मुलं जन्माला घाला...असं झालं तरच भारत माता खऱ्या अर्थानं निर्माण होईल, असं साध्वी प्रज्ञानं म्हटलंय. 


आध्यात्मिक प्रवचनाचे दौरे


मालेगाव स्फोटाच्या आरोपींपैकी एक असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सध्या आध्यात्मिक प्रवचनाचे दौरे काढत आहेत. त्यापैकीच एका प्रवचनाच्या निमित्तानं त्या आज औरंगाबादमध्ये होत्या. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.