वसई : विरार समुद्रातील लाटांचा मच्छिमारांच्या घरांना तडाखा बसला. लाटांच्या ताडाख्याने अर्नाळा किल्ल्यातील किनाऱ्यावरील पाच ते सहा घरे वाहून गेलीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दिवसभर समुद्रात भरती असल्याने १० फुटांच्यावर उंचीच्या लाटा उसळत होत्या. याचा फटका किनाऱ्याजवळील घरांना बसला. त्यामुळे मोठ्याप्रमाणात घरांचे नुकसान झाले.


अशुमती दत्तात्रय म्हात्रे, अनुशया शांताराम मेहर, पुष्पां महेंद्र मेहर यांच्या घरांसह अन्य तीन ते चार रहिवाश्याची किनाऱ्यावरील घरे वाहून गेलीत.