मुंबई : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक होणार आहे. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत मि़ळत नसेल आंदोलन करा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी तालुका प्रमुखांना दिले आहेत.


कधीही निवडणुका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, देशात आणि केंद्रात कधीही निवडणुका लागू शकतात. या परिस्थितीत काम कसे करायचे याबाबत उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन घेतले.  


शिवसेनेला ऑफर नाही


मतदार याद्या अद्ययावत करणे आणि गावात संपर्क अभियान सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या कोण कोणत्या योजना गावात पोहचल्या आहेत याबाबत माहिती घेण्यास सांगितले आहे. शिवसेनेला १५० जागांची ऑफर नाही, या सगळ्या थापा आहेत, असेही ते म्हणाले.