नाशिक : Sanjay Raut On Shiv Sena Crisis : मुंबई , ठाणे, नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल तिथे प्रशासक नेमलेले आहेत. तेथे नगरसेवक कसे असणार, नगरसेवक फुटले नाहीत,  लोक शिवसेनेच्या मागे उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहिले आहेत. राज्यात काय सुरु आहे याचा नाशिकशी काहीही संबध नाही. नाशिकमध्ये शिवसेना जागच्या जागी आहे. नाशिकचे सर्व नगरसेवक शिवसेनेसोबत असून नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या जे काही सुरु आहे ते कृत्रिम वादळ आहे. ते दूर होईल आणि शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील. भाजपला चाळीस नवे भोंगे मिळाले आहेत, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या हो. धनुष्य बाण हे चिन्ह शिवसेनेचे आहे आणि शिवसेनेचेच राहील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.


 महाराष्ट्राचे कसे घडू शकतं? मातोश्रीच्या पाठीत खंजिर खुपसू शकता,  बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांच्या संदर्भात, अशी दगाबाजी कशी होऊ शकते. ज्या 'मातोश्री'ने भरभरून दिलं सगळ्यांना त्यांच्या बाबतीमध्ये हा जो प्रकार झालेला नाही. महाराष्ट्राची बदनामी करणे महाराष्ट्राचे तुकडे करणं मुंबईला आमच्यापासून तोंड आणि त्यासाठी शिवसेना कमजोर करण्याचा प्रयत्न होत आहे, असा घणाघात त्यांनी भाजपवर केला.


 नाशिक जिल्हा शिवसेनेचे केंद्र आहे. नेहमी बाळासाहेबांच्या पाठीशी राहिले आहे. नाशिक महानरपालिकेवर सेनेची सत्ता येणार आहे. नाशिकचे अनेक नगरसेवक संपर्कात आहे,  कुणीही गैरहजर नाही, असे राऊत म्हणाले.