पुणे : खासदार संजय काकडेंचं राज्यसभेचं तिकीट कापण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं भाजपवर चांगलंच तोंड सुख घेतलं आहे. 'खरं तर उदयनराजे यांचं पूर्नवसन करण्यासाठी संजय काकडे यांचं भाजपने तिकीट कापलं असल्याचं', खासदार सुनील तटकरे म्हणाले आहेत. मात्र त्याचबरोबर काकडे यांच्यावर देखील तटकरे यांची तोंड सुख घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'संजय काकडे म्हणजे वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि याच वाचाळवीरांना पायबंध घालण्यासाठीच भाजपंने हे पाऊल उचललं.' असं मत सुनील तटकरे यांनी मांडलं आहे. संजय काकडे अधिकार नसताना बोलण्यात पटाईत असल्याचा घणाघत देखील सुनील तटकरे यांनी केला आहे. 


दुसरीकडे शिवसेनेने देखील भाजपवर निशाणा साधला असून जो पर्यंत आहे तो पर्यंत वापरून घ्या, त्यानंतर फेकून द्या अशी भाजपची भूमिका असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.