नाशिक : शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे, हे सहन होत नसेल तर स्पष्ट सांगा, असं भाजपचं नाव न घेता शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शिवसेनाअजून रस्त्यावर उतरलेली नाही. त्यामुळे फक्त कांदे फेकले जात आहेत. जर उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले तर भाजपच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही असा इशारा आज संजय राऊत यांनी दिलाय. ते नाशिकमध्ये बोलत होते.  


शेतक-यांच्या आंदोलनाची ठिणगी दोन महिन्यापूर्वी शिवसेनेनं घेतलेल्या कृषी अधिवशनात पडल्याचा दावाही यावेळी राऊत यांनी केला. शिवसेना नेहमी शेतक-यांच्या पाठिशी राहिली आहे.जर सरकारला प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडावी या विधानाचा राऊत यांनी पुनरुच्चा केला.