कोल्हापूर : जम्मू-काश्मीरमध्ये देशाची सेवा बजावताना कोल्हापूर जिल्ह्यातील गोगवे गावचा वीर जवान श्रावण बाळकू माने शहीद झालेत. श्रावणला आज अखेरची सलामी देत पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहिद श्रावण माने यांचं पार्थिव दिल्लीहून आज सकाळी मूळगावी आणण्यात येणार आहे. त्यानंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.


अवघ्या २४ वर्षांचा जवान पाकिस्तानी सैन्याशी लढताना शहीद झाल्यामुळे गोगवे गावात संतापाची लाट उसळलीय. संतप्त ग्रामस्थांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध नोंदवला.


भारत सरकारनं पाकिस्तानी सैन्याशी दोन हात करुन जशास तसं उत्तर देण्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केलीय.