मुंबई : राज्य सरकारमधले ज्येष्ठ मंत्री गिरीष बापट यांच्या वादग्रस्त विधानाने भाजपला अवाक केलंय. सध्या सत्तेत असलो तरी पुढं काय होणार हे आपल्याला माहिती आहे. वर्षभरानंतर सत्ता बदलणार आहे, असं धक्कादायक विधान बापट यांनी पुण्यात केलं. त्यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापट यांना टोले लगावले. मात्र त्याचबरोबर बापट यांची पाठराखणही केली. 


भाजपला अवाक् करणारं विधान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे सरकारमधले ज्येष्ठ मंत्री गिरीष बापटांनी यावेळी भाजपला अवाक् करणारं विधान केलंय.  सध्या सत्तेत असलो तरी पुढं काय होणार आहे, हे आपल्याला माहित आहे. वर्षभरानंतर सत्ता बदलणार आहे, असं धक्कादायक विधान गिरीष बापट यांनी पुण्यातल्या डाळिंब परिषदेत केले.


सत्तेत येण्याबाबत बापटांनी संशय


काय घ्यायचं असेल ते आताच घ्या, पुढं काय होईल ते आपल्याला माहीत आहे? असं सांगत भाजप पुन्हा सत्तेत येण्याबाबत बापटांनी संशय व्यक्त केला. यामुळं उपस्थितांसह भाजपलाही बापटांनी अवाक् केले. त्यामुळे राजकीय चर्चा जोरदार रंगली. आज पुन्हा भाजपन मंत्र्यांनेच बापटांना टोकले.