औरंगाबाद : येथे आयोजित केलेल्या मुस्लिम अत्याचार विरोधी आंदोलनात स्वामी अग्निवेश यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर कडाडून टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी जर कोणी राम मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला तर मी होऊ देणार नाही, त्याविरोधात आंदोलन उभारण्यासाठी मी सर्वात पुढे असेन, असंही स्वामी अग्निवेश यांनी सांगितले. 


शिवाय वंदे मातरमसाठी कोणी दबाव टाकत असेल तर ते मी म्हणणार नाही, असे ते म्हणालेत. औरंगाबादमध्ये मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग होता, विशेष म्हणजे स्वामी अग्निवेश महाराजांची यावेळी विशेष उपस्थिती होती. 


या आंदोलनातील भाषणात मोदी सरकारवर स्वामी अग्निवेश यांनी जोरदार टीका केली.  शिवाय दारूबंदी करण्यासाठी भाजप सरकारने पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केले आहे.