जालना : Bride cheated on her in-laws : तुम्ही अनेकवेळा बंटी-बबलीची बातमी वाचली असेल. बंटी-बबलीची जोडीने कसा गंडा घातला याची चर्चा किंवा बातमी वाचली असेल. मात्र, आयुष्यभरासाठी जीवनसाथी म्हणून आणली आणि ती निघाली 'डॉली'. नवरीच्या साध्यासुध्या चेहऱ्यावर जाऊ नका, कारण यापुढे नवरीला पारखताना काळजी घ्या अन्यथा देशोधडीला लागण्याची वेळ येईल. असाच प्रकार जालन्यात पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववधुने सासरच्या मंडळींना चांगलाच गंडा घातला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रोख रकमेसह अंगावरील सोन्याचे दागिने घेऊन नववधु फरार झाली आणि नवरदेवाला डोक्याला हात लावण्याची वेळ आली. नववधु रोख रकमेसह दागिने घेऊन गेल्यानंतर 5 जणांविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दोन दिवसांपूर्वीच लग्न होऊन सासरी आलेल्या एका नववधूने सासरच्या मंडळींना गंडा घातला आहे. रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल घेऊन नववधु फरार झाली आहे. भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे ही घटना घडली आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व पाचही आरोपी फरार असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


शेलुद येथील तरुणाचे दोन दिवसांपूर्वी हिंगोली येथील तरुणीशी मंदिरात विधीवत लग्न पार पडलं. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह घरातील रोख रक्कम असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल घेऊन फरार झाली. या प्रकरणी नवरदेवाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नववधूसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे यांनी माहिती दिली.