पंढरपूर: दिल्लीत झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने ही दंगल घडवून आणली. त्यामुळे आता दिल्लीत पुन्हा दंगल झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते शनिवारी पंढरपूर येथे नाभिक समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली हिंसाचार : ८७ जणांना गोळी लागली, पोलिसांची मोठी चूक उघड


यावेळी त्यांनी दिल्ली हिंसाचारावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, राजसत्ता धर्मसत्तेच्या ताब्यात गेली की कारभार व्यवस्थित चालू शकत नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात जे घडलं तेच आता मोदींच्या काळात घडत आहे. दिल्लीच्या दंगलीत अनेकजण सैनिकी गणवेश परिधान करून घुसल्याचे सांगितले जाते. एका अहवालानुसार कोणीतरी २५ लाख सैनिकी गणवेश विकत घेतल्याची माहिती आहे. सरकारने या सगळ्याचा माग काढण्याची गरज आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 


दिल्लीतील हिंसाचारासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच जबाबदार- पवार


यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्ववर स्वामी यांच्या बनावट जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यासंदर्भातही भाष्य केले. बनावट जात प्रमाणपत्रामुळे डॉ. जयसिध्देश्ववर स्वामी यांची खासदारकी धोक्यात आली आहे. याविरोधात डॉ. जयसिध्देश्ववर स्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आता ते न्यायालयाच्या जोरावर खासदारकीची पाच वर्ष काढतील, अशी खोचक टिप्पणी यावेळी आंबेडकर यांनी केली.