पालघर : आज दुपारनंतर अचानक अंधारून आले आणि वादळी वाऱ्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसात पालघरमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. तसेच १४ जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज विजांच्या कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पाऊस आल्याने अनेक ठिकाणी घरांवरील छप्परे उडाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मुंबई, नवी मुंबईस वसई-विरार आणि परिसरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला.


पुढील दोन दिवस कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. पुण्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.