सांगली : विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. सांगलीतील येलूरमध्ये घडलेल्या घटनेत या तिघांमध्ये मायलेकरांचा समावेश आहे. शेतातील विजेच्या तारांना स्पर्श होऊन शॉक लागल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. तारांच्या संपर्कात ५ जण आले. ज्यातील तिघे जागीच ठार झाले तर दोघं सुदैवाने बचावले आहेत. प्रभाकर लक्ष्‍मण महाडिक (वय - ३५), छाया लक्ष्‍मण महाडिक (वय - ५५)  प्रकाश भिमण्‍णा मगदूम (वय- ५१) असे तिघांची नावे आहेत.  पहाटेच्या सुमारास घडली घटना. शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेला स्‍पर्श झाल्याने ही दुर्देवी घटना घडली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.