मनमाड : अपे  रिक्षाला एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या  भीषण  अपघातात  ७  जण  जागीच ठार झालेत. ही घटना  सटाणा - मालेगाव  रोडवर शेमळी  शिवारात  घडली. पहाटेच्या  सुमारास हा अपघात घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगावकडून  सटाण्याच्या  दिशेने जाणाऱ्या अपे  रिक्षाला  शेमळी  शिवारात अज्ञात ट्रकने धडक दिल्याने रिक्षाचा चक्काचूर झालाय. या  रिक्षातील सातही प्रवाशी  जागीच ठार  झाले. सर्व  मृतदेह  सटाणाच्या  शासकीय  रुग्नालायत ठेवण्यात आले  आहे.  



दरम्यान अपघात  मृत्युमुखी  पडलेल्या  प्रवाश्यांचे  नावे  अद्याप समजू शकले नाही. मात्र अपघातस्थळी सापडलेल्या  खेळणी व  इतर साहित्यावरून ते व्यावसायिक असावेत असा अंदाज  बांधला जात आहे.  


सध्या सटाण्यात सुरु असलेल्या यशवंत महाराज यात्रेत स्टॉल लावून व्यवसाय  करण्यासाठी  हे व्यावसायिक  येत असल्याचे  सांगितले  जात आहे.