सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावर जाऊन भवानी मातेची विधीवत आरती केली. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देवीला एका भावुक साकडं घातलं. 


पश्चिम महाराष्ट्रातली काही धरणं भरली असली, तरी महाराष्ट्रावरचं दुष्काळाचं संकट गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. निसर्गातल्या ऑक्सिजनच्या घटत्या पातळीबाबतदेखील उदयनराजेंनी चिंता व्यक्त केलीय.