नांदेड : सध्या सर्वत्र भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलीये. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कोसळलेत. याचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होताना दिसून येतोय. दरम्यान, बाजारात टोमेटोला १ रुपया भाव मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना जिल्ह्यातील परतूर येथे आठवडी बाजारात असाच प्रकार पाहायला मिळाला. आठवडी बाजारात टोमेटो विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. बाजारात टोमेटोला १ रुपया किलो भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोमेटो रस्त्यावर फेकले. यामुळे रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल झालेला पाहायला मिळाला.