विरार : विरारजवळ मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटीला बुधवारी अपघात झाला. मात्र या बोटीवरील 11 खलाशी सुदैवाने वाचले आहेत. एका मालवाहतूक करणाऱ्या अवाढव्य जहाजाने या बोटीला धडक दिली. त्यामुळे या बोटीचे अक्षरशः तुकडे झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर पाण्यात पडलेले खलाशी मदतीसाठी धावा करू लागले. इतक्यात गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका बोटीने या खलाशांना रस्सीच्या सहाय्याने वाचवले. जर ही बोट वेळेत आली नसती तर 11 जणांना जलसमाधी मिळाली असती. धडक देणाऱ्या कार्गो जहाजाने घटनास्थळावरून पळ काढलाय. मच्छीमारांचा हा जीवघेणा प्रवास मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालाय.