कोल्हापूर : भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केलेल्या कोल्हापूर उत्तर निवडणुकीत भाजपचं कमळ उमलणार की काँग्रेसचा हात विजयी होणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.


काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. आठव्या फेरीअखेर त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे. पाचव्या फेरीअंती  भाजपचे सत्यजित कदम हे आघाडीवर आले. पण, त्यांनतर मात्र जयश्री जाधव यांनी पुन्हा आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केलीय.