लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करु नका, असा ठराव मराठा समन्वयकांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.  लातूर येथे ही बैठक पार पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारला यापूर्वीच मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे आता सरकारशी चर्चा करण्याची कोणतीही गरज नाही, असे या बैठकीत ठरले. 


तसेच १ ऑगस्टपासून प्रत्येक मराठा आमदार, खासदार यांच्या घरापुढे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची मदत तसेच शासकीय नोकरीची मागणी करण्यात आली. पुढील राज्यस्तरीय बैठक परभणी इथे होणार आहे.