मुंबई : शहरातील पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, पावसामुळे रात्री घाटकोपर पश्चिम येथे रिलायन्स सबस्टेशन भिंत कोसळून १ ठार तर २ जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपरच्या असल्फा विभागात रिलायन्स सबस्टेशनची भिंत घरावर कोसळून रामेश्वर तिवारी (३८) यांचा मृत्यू तर त्याचा मुलगा कृष्णा तिवारी (९), आणि पत्नी मंजू तिवारी(३२)जखमी झालेत. रात्री 1 वाजताच्या दरम्यानची घटना , जखमींवर राजावाडी रुग्णालयत उपचार सुरु आहेत.


दरम्यान, मुंबईत मंगळवारी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच विक्रोळीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांना जीव गमवावा लागला. वर्षानगर येथे इमारत कोसळून एकाचा तर सूर्यानगर येथे दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.