मुंबई : भारतीय लष्करानं मनात आणलं तर काय साध्य होऊ शकतं याचा जबरदस्त वस्तूपाठ आज आंबिवलीत बघायला मिळाला.


भारतीय लष्कराची शिस्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकात पादचारी पुलाच्या कामासाठी आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास टिटवाळा आणि कल्याण दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीय. आंबिवलीच्या पुलाचं काम सकाळी लष्करी अधिकाऱ्यांनी सुरू केलं.


केवळ नऊ मिनिटात काम पूर्ण



दोन्ही बाजूचे खांब आधीच बांधून झाले होते. फक्त गर्डर टाकण्याचं काम बाकी होतं. लष्करी अधिकाऱ्यांनी हे काम आपल्या कौशल्याच्या जोरावर अवघ्या नऊ मिनिटात पूर्ण केलंय. लष्करी शिस्तीचं अनोखं दरम्यान या निमित्तानं बघयाला मिळालं.