मुंबई : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांनी अटक केली. ही अटक २०१८ मध्ये इंटिरिअर डिझाइनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणासंदर्भात करण्यात आली. अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचा नावाचा उल्लेख होता. ही सुसाईड नोट पहिल्यांदा समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काय आहे हे प्रकरण? 


अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन tv चॅनलच्या स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. यासाठी 5 कोटी 40 लाख एवढे बिल अर्णव गोस्वामी यांच्याकडून घेणे होते. परंतु  वारंवार बिल मागूनही अर्णव गोस्वामी यांच्याकडून बिल दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब याला जबाबदार धरलं होतं. तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे.  या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम 306 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. 


अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 


'२०१८ हे वर्ष आम्ही कधीच विसरू शकत नाही. आज महाराष्ट्र पोलिआंनी  जो दिवस आणलाय त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. सुसाईड नोट मध्ये नाव असून कारवाई त्यावेळी करण्यात आली नाही. पण आज ती केली आहे म्हणून पोलिसांचे आभार मानते', या शब्दात आज अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी आभार मानले आहेत. 



अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणात आज रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. अलिबाग न्यायालयात आज अर्णब गोस्वामीला हजर करण्यात येणार आहे. २०१८ साली अन्वय नाईक यांनी रिपल्बिक चॅनलचे इंटिरिअरचे काम केले होते. त्यावेळी कामाचे पैसे न दिल्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी अर्णब गोस्वामीच्या नावाचा उल्लेख केला होता. या संदर्भात आज अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.