मुंबई : अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मित काटकर यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. काटकर यांचा मुंबईतील कुपर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३ जुलै रोजी अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले होते. या पाच जणांमध्ये अस्मिता काटकर यांचाही समावेश होता. दुर्घटनेनंतर काटकर यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी काटकर यांची प्रकृती आणखी ढासळल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. मात्र अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. 


दरम्यान, मुंबईतल्या अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईकरांमध्ये, भीतीचं वातावरण पसरलं होतं. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, मोडकळीला आलेला वांद्रे आणि माहीम दरम्यानचा वाहतूक पूल बंद करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनानं दिले आहेत.