Rahul Gandhi On Savarkar, मुंबई : सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi ) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पेटले आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून राहुल गांधीवर जोरदार टीका होत आहे. भाजप नेते आशिष शेलार(BJP Ashish Shelar) यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत राहुल गांधीना बेअक्कल म्हणत जोरदार टीकास्त्र सोडले.  राहुल गांधींचं सावरकरांबद्दलचं वक्तव्य म्हणजे बेअक्कलपणा असल्याचा घणाघात शेलार यांनी केला. शेलार यांनी इंदिरा गांधी(Indira Gandhi) यांनी लिहीलेले पत्र वाचून दाखवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदिरा गांधी यांनी या पत्रात सावरकर यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. राहुल गांधी कोणताही अभ्यास न करता असा प्रकारची वक्तव्य करत आहेत. यावेळी शेलार यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे बोटचेपी भूमिका घेत आहेत. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी माती खाल्ल्याची टीका शेलार यांनी केली.   


राहुल गांधींच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्याशी सहमत नाही अस स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी काँग्रेससोबत एकत्र येणार अशा इशारा देखील ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.


राहुल गांधींविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे देखील आक्रमक झाले आहेत. सावरकरांबद्दलच्या वक्तव्याचा मनसे निषेध करणार आहे. मंत्रिमंडळात राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात निषेध प्रस्ताव दाखल करण्यात आला.