मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर येत आहे. भुसावळ-पुणे रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झालाय.  खर्डी रेल्वे स्थानकात इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला असून गेल्या एक वाहतूक ठप्प आहे.


प्रवाशांना मनस्ताप 


कल्याण-कसारा मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झालाय. त्यामुळे सकाळी कामाला निघालेल्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. त्यांना रेल्वे स्थानकावरच ताटकळत राहावे लागत आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा इंजिनमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.