मुंबई : दिवाळीच्या सुट्ट्या संपवून कामावर परतणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. सकाळी सकाळी मध्यरेल्वेच्या लोकल वेळापत्रकाचा बोऱ्या वाजला आहे. कांजूरमार्ग स्थानकात  तांत्रिक बिघाडामुळे लोकल बंद पडली. आता लोकल दुरुस्त करून पुढे रवाना करण्यात आली असली तरी रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीन तेरा वाजले आहेत. यामुळे कामावर वेळवर पोहचायचं असेल, तर नेहमीच्या वेळेआधीच घरातून निघणं जास्त श्रेयस्कर ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवरच्या काही लोकल गाड्या देखील रद्द केल्या आहेत. यामुळे सकाळीच प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.