मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. कल्याण आणि विठ्ठलवाडी दरम्यान वाहतूक यंत्रणेत बिघाड झाल्याने, ही वाहतूक ठप्प झाली आहे. 


मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धीम्या गतीने आणि जलद गतीने जाणाऱ्या सर्व लोकल गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. चारही मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने, प्रवाशी तासाभरापासून खोळंबले आहेत.


लांब पल्याच्या गाड्याही रखडल्या


मध्य रेल्वेची वाहतूक यंत्रणा, आणि सिग्नल पूर्ववत करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. फक्त लोकल गाड्याचं नाही, तर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रखडल्या आहेत.


दुपारच्या वेळेस ही वाहतूक ठप्प झाली आहे, मात्र लवकरात लवकर ही सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेकडून सुरू आहेत.