मुंबई : 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आम्ही पवारसाहेबांना का टार्गेट करतो, किंवा त्यांच्यावरच टीका का करतो. मुख्यमंत्री म्हणाले, 'टार्गेट असं कुणी नसतं, विरोधक जी टीका करतात, त्याला आम्ही उत्तर देतो, शरद पवार रोज आमच्यावर टीका करतात, त्यांना आम्ही टीकेनं उत्तर देतो'.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढे बोलताना, मुख्यमंत्री म्हणाले 'काँग्रेसमध्ये कोण नेता आहे, कुणाबद्दल आम्ही बोलायचं सांगा, राहुल गांधींबद्दल बोलायचं, काही बोलण्यालायकचं नाही, किंवा त्यांच्या राज्यातील नेत्यांबद्दल बोलायचं तर त्यांचं अस्तित्व दिसतंच नाही'.



मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर बोलताना सांगितलं, 'काँग्रेस सैरभैर झाली आहे, काँग्रेसमध्ये आज कुणीच दिसत नाही, शरद पवारसाहेब रोज आम्हाला टार्गेट करतात, आम्ही देखील टीकेच्या स्वरूपात प्रतिहल्ला करतो, यामुळे लोकांना असं वाटतं की आम्ही रोज राष्ट्रवादीवर टीका करतो.'