मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री उशिरा औरंगाबादमध्ये बोलताना त्यांनी अनेक विषयांवर वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, मी कालपासून फिरतोय. प्रचंड असा नागरिकांचा पाठिंबा मिळतोय
, तुमचे धन्यवाद, आभार. आम्ही घेतलेली भूमिका पटली आहे ना असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थितांना केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन निघालो आहे. हे युतीचे सरकार आहे. पोलीस भरती लवकर होणार आहे असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


आज संभाजीनगर साठी अनेक निर्णय घेतले आहेत. ज्यांनी आम्हाला त्रास दिला ते आपापल्या कर्माने जातील असा टोला देखील त्यांना लगावला आहे. आम्ही 24 तास काम करणार. मराठा आरक्षणसाठी आम्ही काम करणार आहोत, मराठा समाजाला न्याय आम्ही देणारच असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.