मुंबई : सुरक्षित म्हणवणा-या महाराष्ट्रात गुन्ह्यांची संख्या किती वाढत चाललीय त्याचा लेखाजोखा मांडणारा अहवाल खुद्द केंद्र सरकारनं जाहीर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोनं 2016 सालचा गुन्हेविषयक अहवाल नुकताच जाहीर केलाय. यात महिलांना मारहाण करण्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असल्याचं स्पष्ट झालंय. 


महिलांचे अपहरण करण्यात महाराष्ट्र दुसरा तर बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक असल्याचं केंद्र सरकारच्या अहवालातून समोर आलंय.