मुंबई : गेले दहा दिवस राज्यात गणेशोत्सवाचा आनंद पहायला मिळतो आहे. लाडक्या गणरायाची मनोभावे पूजाअर्चा आणि सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. बाप्पा आज आपल्या गावाला जातील मात्र पुढल्या वर्षी लवकर येण्याचं भक्तांना आश्वासन देऊनच.


आजचा हाच विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह निराळाच असतो. त्यामुळे मुंबई, पुण्यात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. तर पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूकही खास असते. यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.