मुंबई : कोरेगाव भीमा दंगल हे फार मोठं षडयंत्र असल्याचा, आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केला आहे.


सतर्क राहण्याचे आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नजीकच्या भविष्यात राज्यात जातीय तेढ निर्माण करणारी परिस्थिती उदभवू शकते. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सतर्क राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केल्यात. 


कार्यकर्त्यांनी कामाला लागावे


कोरेगाव दंगल प्रकरणी सरकारनं आपली जबाबदारी नीट पार पाडल्याचाही दावा त्यांनी केला. भाजप आणि सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीवर लक्ष देऊन निवडणुकीच्या तयारी लागण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना केल्या.