Lalbaugcha Raja 2022 : 'कोण आला  रे कोण आला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja ) आला, ही शान कुणाची मुंबईच्या राजा' ची अशा घोषणा देत मुंबईची (mumbai) शान असलेला लालबागचा राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात शनिवारी सकाळी 6.30 च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpatty) दाखल झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती. यानंतर समुद्रात 'लालबागच्या राजा' चे शाही विसर्जन करण्यात आले असून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...'च्या गजरात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. (Lalbaugcha Raja 2022 Visarjan)


दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील 10 दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याचा सर्व बॅकलॉग यंदाच्या मिरवणुकीत भरून निघताना दिसत आहे. मुंबईतील लालबाग परिसर असो किंवा मग पुण्यातील लक्ष्मीरोड परिसर ठिकठिकाणी भक्तांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळालं.


तर दुसरीकडे लालबागमधील गणेशगल्लीतील (ganeshgalli raja) मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २२ फुटी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता सुरुवात झाली. ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत आणि गुलालाची उधळण करत मुंबईच्या राजाची मिरवणूक निघाली आहे. 


तर मुंबईतील (mumbai) लालबागमध्ये काल, शुक्रवारी सकाळी 11  वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाची आरती घेऊन मिरवणुकीला सुरूवात झाली. पारंपारिक वेषातच भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. यावेळी ढोलताशांचा दणादणाट... फटाक्यांची आतषबाजी...गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक सुरू होती. 


यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja ) खोल समुद्रात नेऊन निरोप दिला जातो. 22 तासांनंतरही गणेशभक्तांच्या उत्साहात कमी झाली नाही. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर मुंबईकरांनी अलोट गर्दी केली होती.  तब्बल 22 तासांच्या उत्साहपूर्ण, जल्लोषात आणि ढोलताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणूकीनंतर लालबागच्या राजा चे गिरगाव समुद्रात शाही विसर्जन करण्यात आले.


राज्यात चोख पोलीस बंदोबस्त 
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सूचनांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसोबतच प्रशासकीय यंत्रणांनीही कंबर कसली आहे. मोठ्या उत्साहात, थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. त्यासाठी किनारपट्टीवरही पोलिसांनी यंत्रणा उभी केली आहे. एसआरपीएपच्या ८ तुकड्या पोलिस बंदबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तर ३ हजार अधिकरी आणि १५ हजारांच्या वर पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आलेत.