मुंबई : नाशिकहून मुंबईमध्ये हजारो शेतकरी दाखल झाले आहेत. हजारो शेतकरी पायी प्रवास करत मुंबईत दाखल झाले आहेत. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा मोर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवार उन्हामध्ये देखील हा मोर्चा मुंबईच्या दिशेने येत आहे. सोमवारी शेतकरी मंत्रालयाचा घेराव घालणार आहेत. या मोर्चाला शिवसेनेसह, काँग्रेस, मनसे यांनी देखील पांठिबा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील या मोर्चाला भेट देणार आहेत. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता सोमैय्या ग्राउंडवर या मोर्चाला भेट देणार आहेत.